Ahilyanagar Diwali: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी दिवाळीचा पहिला दिवा अर्पण; शिवप्रेमींच्या जयघोषाने दुमदुमला परिसर

Photo of author

By Dipak Shirsath

 

Ahilyanagar Diwali,छत्रपती शिवाजी महाराज,दिवाळी,

अहिल्यानगर | प्रतिनिधी

Ahilyanagar Diwali: स्वाभिमानी महाराष्ट्र घडविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी दिवाळीचा पहिला दिवा अर्पण करून अहिल्यानगर मध्ये दिवाळी उत्सवाची तेजोमय सुरुवात झाली. मराठा सेवा संघ, मराठा समन्वय परिषद आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ता. २० ऑक्टोबर रोजी शहरातील जुने बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याभोवती दीपोत्सव साजरा करण्यात आला.

लखलखत्या पणत्यांनी उजळलेल्या पुतळ्याभोवती “जय भवानी, जय शिवाजी!”, “जय जिजाऊ, जय शिवराय!”, “जय शंभूराजे!” अशा जयघोषाने परिसर दुमदुमला. या दीपोत्सवात मोठ्या संख्येने शिवप्रेमी, महिला आणि युवक-युवती उपस्थित होते आणि त्यांनी महाराजांना दीपांजली वाहिली.

Ahilyanagar Diwali,छत्रपती शिवाजी महाराज,दिवाळी,

कार्यक्रमास मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अॅड. स्वाती जाधव, अलकाताई मुंदडा, अॅड. अनुराधा येवले, हेमा पडोळे, मेघना मुनोत, लीला अग्रवाल, रेखा मैड, विद्या कुलकर्णी, जयश्री गिरवले, उषा काळभोर, करुणाताई काळे, मिनाक्षी जाधव, वैशाली उदावंत, तसेच गोरख दळवी, गोरक्षनाथ पठारे, सागर भोसले, मनोज सोनवणे, वैभव कोकाटे, सिध्दांत पानसरे, भारत भोसले, मनोज बारस्कर, रमेश मुंगसे, संतोष हराळ, अभिजीत हराळ, संदीप नवसुपे, रामदास सातपुते, निलेश सुंबे आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

Ladki Bahin Yojana E-KYC: लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया; लाभ सुरू ठेवण्यासाठी 2 महिन्यांत E-KYC अनिवार्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला. उजेडात न्हालेला पुतळा आणि जयजयकाराच्या निनादाने दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला.

अनिता काळे म्हणाल्या, “दिवाळी म्हणजे बळीराजाचा उत्सव. पण या उत्सवात आपण बळीराजाचेच नव्हे, तर बळीराजाचे राज्य स्थापन करणारे आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही दीप अर्पण करून खरी दिवाळी साजरी करीत आहोत. हा दीपोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा उत्सव आहे.”

Ahilyanagar Diwali,छत्रपती शिवाजी महाराज,दिवाळी,

सुरेश इथापे म्हणाले, “शिवाजी महाराजांच्या तेजोमय कार्याला साक्ष देणारा हा दीपोत्सव म्हणजे स्वराज्याच्या स्मृतींना उजाळा देणारा सोहळा आहे. शिवरायांच्या आदर्शाने समाजात एकता, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागविणे हेच यामागचे उद्दिष्ट आहे. लखलखत्या पणत्यांच्या झगमगाटात शिवरायांच्या चरणी अर्पण झालेला पहिला दिवा म्हणजे स्वराज्याचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा दीप आहे.”

हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा

 

 

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group