प्रतिनिधी ( मुंबई ) ०७.१०.२०२३
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनांमधून लाभार्थीना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना निधी
वितरित करण्यात आला आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ४५० कोटी व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत ७६५ कोटी रुपये असे एकूण १२१५ कोटी रुपये निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरीत करण्यात आला असून लाभार्थींना तो तत्काळ वाटप करावा, अशा सूचना विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.